जिथं मन नेहेमी निर्भय असतं आणि मान अभिमानानं ताठ उभी असते, जिथं ज्ञान सगळ्या बंधनांच्या पलीकडे असतं, मुक्त असतं,
जिथं घरांच्या छोट्या छोट्या संकुचित भिंती विश्वाला तुकड्या तुकड्यात विभागत नाहीत,
जिथं सत्याच्या पायावर शब्दांची शिखरं बांधली जातात,
जिथं दिशा दिशातून अविरत प्रयत्नांचे हजारो स्त्रोत न थकता परमोत्तम आदर्शाकडे वाहतात,
जिथं शुद्ध, सर्जनशील विचारांचा झरा अंध परंपरांच्या शुष्क वाळवंटात सुकून जात नाही,हरवून जात नाही,
जिथं तू नेता आहेस,तू मनाला विचारांच्या आणि कर्माच्या नित्य विस्तारत जाणा-या क्षितिजांची ओळख करून देतोस, हे पितृदेवा !
त्या सदामुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊ दे.. !
- गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोर
🙏🏻 समता ,स्वातंत्र्यता ,बंधुता,न्याय,धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता हा भारतीय प्रजासत्ताकाचा मजबूत पाया आहे,चला तो दिवसेंदिवस अधिक घट्ट करून मानवी विश्व-कल्याणाचा संकल्प करूया..*🙏🏻
🌹 ।।भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।।🌹
🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक-
विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख, परभणी.
Post a Comment